प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते, जी प्रत्येकजण कोणाशीतरी share करायला घाबरत असतो. घाबरण्यामागच कारण काहीही असू शकत. पण, ज्यावेळी गोष्टी मनातल्या मनात घोळायला लागतात, त्यावेळी त्याचे परिणाम काय होतील हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. वरवर सारं काही सुरळीत आहे अस वाटत, पण आत खोलवर कुठेतरी एक वेगळीच अशांतता असते, वादळापूर्वीची कदाचित. आणि जेव्हा केव्हा या अशांततेचा उद्रेक होतो, तेव्हा ती कोणाकोणाला गिळंकृत करेल याची कल्पना कोणालाच नसते.
हे असं, सार कोड्यात का बोलतेय? अस वाटत असेल ना!
कोडं उलगडायला हवं, लवकरात लवकर, जराही उशीर न करता, कारण आत्ता केलेला उशीर पुढे किती महागात पडेल नाही सांगू शकत.
माणसामाणसात सुसंवाद हवा. "सुसंवाद" जो हरवत चाललाय कुठेतरी. या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण कामात busy असतो, पण थोडा वेळ आपल्यासाठी, आपल्यांसाठी हवाच, नाहीतर दुरावा निर्माण होतो, न संपणारा.
काही घरांत आज मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुसंवाद नाही. मुलांना आईबापाचा धाक हवा आणि प्रेमही, कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. सगळेचजण social sites वर आधार शोधत असतात, विशेषतः आजची तरुण पीढी, online खूप मित्रमैत्रिणी पण गरजेच्या वेळी कोणी आहे का? सोबत उभं राहायला. वेगवेगळ्या generation मधले मतभेद, आणि त्यावरून होणारे वाद कोणालाच नवीन नसतील. पण मी म्हणतेय, कशासाठी हे सारं? शांतपणे बोलून आपापली मतं कुणी मांडूच शकत नाही का? समोरच्याने कमीपणा घ्यावा असा अट्टाहास का धरता? कधीतरी स्वतः कमीपणा घेऊन समोरच्याच बोलणं ऐकून घ्या ना. निदान ऐकायला शिका, जर कुणाचं काही ऐकणारच नाही, तर समजून कस घेणार!
समोरचा जर त्याच मत मांडत नाही तर तो घाबरतोय किंवा त्याला स्वतःच अस काही मतच नाही अस नाही. कदाचित तुमचं मत समोरच्याला महत्वाचं वाटत असेल. आणि जरी समोरचा घाबरत असेल, तर त्याने तुम्हाला घाबरायचं कारण काय, असाही विचार करा. एखाद्याने घाबरून जगावं, अशी वेळ का येतेय कोणावर? कधीतरी विचार करा.
गोष्टी जर समोर दिसतायत तर त्यांना नजरंदाज करू नका, हाताबाहेर जाऊ देऊ नका, संवाद करा. पण जे काही बोलाल ते विचार करून बोला आणि बोलल्यावर काय बोललात त्याचाही थोडा विचार करा, कारण वादापेक्षा संवाद बरा.
हे असं, सार कोड्यात का बोलतेय? अस वाटत असेल ना!
कोडं उलगडायला हवं, लवकरात लवकर, जराही उशीर न करता, कारण आत्ता केलेला उशीर पुढे किती महागात पडेल नाही सांगू शकत.
माणसामाणसात सुसंवाद हवा. "सुसंवाद" जो हरवत चाललाय कुठेतरी. या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण कामात busy असतो, पण थोडा वेळ आपल्यासाठी, आपल्यांसाठी हवाच, नाहीतर दुरावा निर्माण होतो, न संपणारा.
काही घरांत आज मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुसंवाद नाही. मुलांना आईबापाचा धाक हवा आणि प्रेमही, कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. सगळेचजण social sites वर आधार शोधत असतात, विशेषतः आजची तरुण पीढी, online खूप मित्रमैत्रिणी पण गरजेच्या वेळी कोणी आहे का? सोबत उभं राहायला. वेगवेगळ्या generation मधले मतभेद, आणि त्यावरून होणारे वाद कोणालाच नवीन नसतील. पण मी म्हणतेय, कशासाठी हे सारं? शांतपणे बोलून आपापली मतं कुणी मांडूच शकत नाही का? समोरच्याने कमीपणा घ्यावा असा अट्टाहास का धरता? कधीतरी स्वतः कमीपणा घेऊन समोरच्याच बोलणं ऐकून घ्या ना. निदान ऐकायला शिका, जर कुणाचं काही ऐकणारच नाही, तर समजून कस घेणार!
समोरचा जर त्याच मत मांडत नाही तर तो घाबरतोय किंवा त्याला स्वतःच अस काही मतच नाही अस नाही. कदाचित तुमचं मत समोरच्याला महत्वाचं वाटत असेल. आणि जरी समोरचा घाबरत असेल, तर त्याने तुम्हाला घाबरायचं कारण काय, असाही विचार करा. एखाद्याने घाबरून जगावं, अशी वेळ का येतेय कोणावर? कधीतरी विचार करा.
गोष्टी जर समोर दिसतायत तर त्यांना नजरंदाज करू नका, हाताबाहेर जाऊ देऊ नका, संवाद करा. पण जे काही बोलाल ते विचार करून बोला आणि बोलल्यावर काय बोललात त्याचाही थोडा विचार करा, कारण वादापेक्षा संवाद बरा.
No comments:
Post a Comment