Thursday, March 19, 2020

बाईच बाईपण!

     म्हणतात ना, बाईच बाईपण बाईलाच माहीत. खरच आहे ते! तिच्या व्यथा तिलाच कळणार. आता आपले सण सुरु होतायत,एकापाठोपाठ एक. सगळयांनाच वाटत असतं सारे सण कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावे. आता ही अडचण नक्की कुठली ??? एक बाईच समजून घेऊ शकते. कुठलाही सण येणार असला की बायका दिनदर्शिका हातात घेऊन तारखा पाहू लागतात. सण आणि त्या तारखा जवळपास असतील तर गोंधळच.
     आता जास्त आढेवेढे न घेता स्पष्ट करते त्या तारखा म्हणजे नक्की कुठल्या, पाळीच्या तारखा. खर आहे ना?? आपल्या घरी नाही तर शेजारीपाजारी, आपल्या नात्यातल्या घरात या गोष्टीचा फार मोठा issue  केला जातो. त्या दिवसात हे नाही करायच, ते नाही करायच, इथे हात नाही लावायचा, तिथे हात नाही लावायचा, अस, तस आणि बरच काही. खरच, या सगळयाची गरज असते का?? असते तर का असते हे कुणाला माहीत आहे का?? अस ना तस प्रत्येकाला हा विषय माहीत आहे. पाळी म्हणजे एक अडचण अशीच मान्यता आहे. पण त्याशिवाय बाईला बाईपण आहे का? त्याशिवाय तिच्या स्तित्वाला कोणी महत्व देत का?
    खर तर ही एक देणगी आहे, जी देवाने फक्त स्त्रीला प्रदान केलीये. जिच्याकडे ही देणगी नाही तिला समाजात असंख्य अडचणींना सामोर जाव लागत. आता समाज बदललाय म्हणा पण तरीही. बर यासाठी स्त्रीचीच निवड का झाली असेल?कारण काहीही असो, मला एवढच वाटत की, कुणीही कधीही एखादया स्त्रीला तिच्या स्त्री असल्याचा व्देष, मत्सर वाटावा अस वागू नये. तुम्हाला वाटत असेल अस कशाला वाटेल, पण काही स्त्रिया ज्या हे वाचताहेत,आणि अशा परिस्थितीला सामोर जाव लागलं असेल त्यांना नक्की पटेल. 
     त्या दिवसात किती त्रास सहन करावा लागतो हे स्त्रीलाच माहित. कितीही त्रास होत असला, आणि होणार असला तरीही सणसुद आला की अडचणी नको. मग काय, घ्या गोळ्या ढकला तारखा पुढे, आणि नंतर होणारा त्रास सहन करा. एवढा अट्टाहास कशासाठी? आपण कितीही प्रयत्न केला तरीही सारच काही आपल्याला मिळेल हे गरजेच नाही. बर जर स्त्री गोळया खाऊन तारखा पुढे ढकलतेय तर त्याचा तिला जो त्रास होतो त्यावर उपाय करायची तयारी मात्र कुणाचीच नाही. कधीतरी विचार करा अशा वेळी त्या स्त्रीला काय वाटत असेल. बर एवढ करूनही जर गोळयांचा असर नाही, तर मग तोंड वर करून बोलून दाखवणारे असतात की सणात मोडता घातला. अशा वेळी एखादया स्त्रीला तिच्या बाई असल्याचा व्देष का वाटणार नाही.
     समाज बदललाय पण काही ठिकाणी मानसिकता तीच आहे. वरवर दाखवायच आम्ही नव्या विचारांचे मनात मात्र जुन्या विचारांची गाठोड़ी तशीच आहेत, गरजेप्रमाणे ती सोडायची आणि हवे ते विचार मांडायचे. जुनी लोकं काय विचार करतात देव जाणे, पण मला वाटत त्या दिवसात स्त्रीला जे निर्बंध घातले जात ते तिला आराम मिळावा यासाठी असतील, पण लोकांनी त्याबाबत गैरसमज करून घेतले असावेत. 
     काही घरात तर खाण्यापिण्याची भांडी, कपड़े सार काही वेगळं. त्या स्त्रिला आत्मसन्मान आहे की नाही तिला अगदी वाळीतच टाकल जात त्या दिवसात. सांगायचा मुद्दा एवढाच की जेव्हा एखादया स्त्रीला अशा प्रसंगाला सामोर जाव लागत तेव्हा तिचा आत्मसन्मान दुखावतो. अशावेळी तिला जी देणगी लाभलीये तिच तिला आभिशाप भासू लागते. अर्थात, तिचं अस्तित्व स्वीकारा, स्त्री असो वा पुरुष, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी आदर असणं गरजेच आहे. 

No comments:

Post a Comment

बाईच बाईपण!

     म्हणतात ना, बाईच बाईपण बाईलाच माहीत. खरच आहे ते! तिच्या व्यथा तिलाच कळणार. आता आपले सण सुरु होतायत,एकापाठोपाठ एक. सगळयांनाच वाटत असतं ...